आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडीगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले 'उदयोग' हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्यं समोर येतं, तर कधी होर्डिग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत...तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांच...