रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये म्हणजे भारतीय संस्कृतीचे ज्ञानकोशच आहेत. महर्षी वेदव्यास आणि महर्षी वाल्किकींचे केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर अनंत उपकार आहेत. कारण त्यांनी आपल्या दिव्यदर्शी, त्रिकालदर्शी प्रतिभेतून या दोन महाकाव्यांमध्ये संपूर्ण मानवी जीवनाचे जे
सर्वस्पर्शी विवेचन केले आहे त्याला जगातल्या कुठल्याही वाङ्मयात जोड नाही. "व्यासोच्छिष्ट जगत्स र्वम्' असे जे म्हणतात ते याचमुळे....