आता कलकत्त्यावर स्वारी करायची होती. इंग्रजांना पुरते बुडवायचे होते. मोठे सैन्य आणि भरपूर तोफा लागणार होत्या. तोफांचा कारखाना तर काढलाच पण स्वत: यशवंतरावही तोफा ओतण्याचे काम करु लागले. विषारी वायुंनी त्यांचा घात केला. एक झंझावात वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी विसावला. पण युद्ध संपले होते काय?