कृष्णभक्त मिराबाई या राजस्थान मधील उच्चकुलीन हिंदु परीवारातील वैष्णव पंथातील एक महत्वाच्या स्त्री संत होत. त्यांची कृष्णभक्ती एवढी प्रसिध्द आहे की त्यांच्या इतकं श्रीकृष्णावर प्रेम करणारं क्वचितच कुणी असेल. श्रीकृष्णावर निस्सीम प्रेम करण्याकरताच त्यांचा जन्म झाला होता असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
जवळपास 1200 ते 1300 श्रीकृष्णाला उद्देशुन लिहीलेल्या रचना आजही त्यांच्या भगवद्भक्तिची साक्ष देतात.