भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. द्रौपदी ही एक अविस्मरणीय सबला स्त्री होती. तिची कहाणी आपल्या मनात तिच्याविषयी आदरभाव निर्माण करते कारण आपल्या अपमानाने पेटून उठणारी ही स्त्री सामर्थ्य, वीरता, धाडस, दया, क्षमा, शांती अश...